शुक्रवारपासुन पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार २८ ऑक्टोबर पर्यन्त उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः ह्या पावसाची शक्यता मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात अधिक जाणवते.
तारीख-वार नुसार जिल्हनिहाय पावसाची शक्यता अशी
दि.२५-नाशिक, जळगांव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.सं.नगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
दि.२६-मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड
दि.२७-धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर
दि.२८-पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड
कश्यामुळे पावसाची शक्यता ?
i)आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैरूक्त ला ५७० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ह्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता जाणवते.
ii) आग्नेय बं उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे उद्या मध्य बं. उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.