पाऊस लवकरच विश्रांती घेणार – पंजाब डख यांचा हवामान अंदाज
पाऊस कधी विश्रांती घेनार? राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाचा मुक्काम आणखी तीन दिवस आसनार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार २८, २९ आणि ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दोन चक्रीवादळे सक्रिय असल्याने हा पावसाचा राज्यात पडत आहे मात्र, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नैसर्गिक संकेत मिळाला आहे—शेतात ‘जाळी धुई’ (कोळ्यांची जाळी आणि दव) पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या या संकेतानुसार, जाळी धुई पडल्यानंतर राज्यातून पाऊस १२ दिवसांनी कायमचा निघून जातो असे पंजाब डख यांचे म्हनने आहे.
त्यामुळे, १ नोव्हेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार असून, २ नोव्हेंबरनंतर राज्यात पावसाची तीव्रता कमी होईल अशी माहिती डख यांनी दिली आहे.
सध्या पडणारा पाऊस हा सर्वदूर नसून तो ‘भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा’ असेल. याचा अर्थ सर्व काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी रिमझिम, किंवा काही गावे वगळली देखील जातील. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा, तसेच मुंबई, पुणे, नाशिक या भागांमध्ये २८ ते ३० ऑक्टोबर या काळात पावसाचे वातावरण राहील.
शेतकऱ्यांनी या चार दिवसांत विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसानंतर थंडीची चाहूल राज्यातून पाऊस पूर्णपणे ओसरताच थंडीची चाहूल सुरू होणार आहे. २ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्राकडे (नाशिक, निफाड, नंदुरबार, जळगाव) थंडीची सुरुवात होईल. ही थंडी हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत जाईल. सोलापूर जिल्ह्यासह इतर दक्षिणेकडील भागात ही थंडी ४, ५, किंवा ६ नोव्हेंबरपर्यंत पसरेल.
थंडीच्या या सुरुवातीच्या काळात २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत ‘धुई, धुके, धुराळे’ (मिस्ट/धुके) चे वातावरण असेल. हे ढगाळ वातावरण थंडीच्या आगमनाची सूचना देईल. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या पिकांची कामे आणि नियोजन करावे, तसेच हवामानात अचानक कोणताही बदल झाल्यास त्वरित नवा संदेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी. (पंजाब डख)










